Sunday, October 17, 2010

जयदेव.. जयदेव...

काल ब-याच दिवसांनी देवळात आरती करायला गेले होते. बऱ्याच वर्षांनी म्हणायला हवं. माझ्या घरी नवरात्र नाही, फारसं देवा धर्माचंही काही बंधन नाही. म्हणजे सक्ती नाही. पण नवरात्रातल्या आरतीची एक परंपरा बनली आहे. शेजारीच कपालेश्वराचं मंदीर आहे आणि गेल्या तीन पिढ्या तरी घट बसल्यापासून तिथल्या आरतीला आमच्या घरचा पुढाकार असायचा. माझ्या बाबा आणि काकांनी आरती संग्रह देखील प्रकाशित केला होता.

एरवी मी देवळात सहसा जात नाही, आणि कधी गेलेच तर देवळात आहे म्हणून लगेच कुणाहीपुढे हात जोडत नाही. पण आरती करायला आवडायचं. तो झांजा-टाळ-घंटांचा नाद.. सगळ्या लोकांचं एका स्वरात गाणं.. आणि नंतर मंत्रपुष्प म्हणताना धीरगंभीर वातावरण.. भारावून जायला व्हायचं. त्यातही कुणाला कीती आरत्या येतात, कोणाचा आवाज मोठ्ठाय आणि कोणाचे उच्चार अगदी स्पष्टयत, अशी काहीशी चढाओढ लागायची. 'अश्विन शुद्ध पक्षी' सुरू झाल्यावर तर विचारायलाच नको. दोन ग्रुप पडायचे चक्क. कोण कुठल्या आरतीला कसा पॉझ घेणार, कोण कुठले देवे म्हणणार, कोण कुठं उभं राहणार हेही ठरून गेलं होतं.

खूप आरत्या पाठ होत्या तेव्हा. त्या कुठून आल्या, कशा रुजल्या याचीही माहिती जमा केली होती. आणि नवरात्रात रोज रात्री साडे नऊ वाजता देवळात हजर व्हायचो सगळा अभ्यास वगैरे आटोपून. कधीच खंड पडला नाही.

देवळात आरती सुरू असताना बाहेर चौकात गुजराथी समाजाचा गरबा सुरू व्हायचा. आणि त्या लाऊडस्पीकरच्या आवाजातही आरतीचा एकजीव सूरच ऐकू यायचा. मला तेव्हा प्रश्न पडायचा- आजही पडतो. एकाच देवीची पुजा करणारे लोक, एकाच आईची लेकरं अशी वेगवेगळी चूल का मांडतात?

नवरात्राचं खरं रूप कोणतंय? देवळातली पूजा-आरती, घरोघरची घटस्थापना,भोंडला, गरबा, रावणवध, शाळेतला शारदोत्सव सोने खरेदी की शेतावरची कापणी? की हे सगळं आणि आणखी बरंच काही?

प्रश्न पडत राहिले.. भाबडी श्रद्धा कमी होत गेली तशी मी मंदिरापासून दूर गेले. आरती करायला मात्र नेमानं जायचे. नंतर 'बिझी शेड्युल'मध्ये तेही सुटलं. काळ पुढे सरकत गेला, तशी आरतीची एक एक मंडळी कमी होत गेली. आरत्यांची संख्याही कमी झाली. काही मंडळी मात्र टिकून राहिली आहेत. मी तीन वर्षांनी आरतीसाठी गेले तेव्हा खूप नॉस्टॅल्जिक झाले. एक वेगळीच हुरहूर वाटली आणि समाधानही. आरत्या सगळ्याच विसरून गेलेले नाहीए.. त्यावेळचा आनंदही तसाच आहे. कदाचित देवळात कोणतही मागणं घेऊन गेले नव्हते म्हणून असेल, पण खूप शांत वाटलं बऱ्याच दिवसांनी.

Monday, August 16, 2010

Freedom of a different kind...

There is something about flowing water.. It gives you eneregy. And now I feel full of it..
पावसाळा आणि रविवार म्हणजे कर्जतला जाणाऱ्या सगळ्या गाड्या फुल. मुंबईकर या परिसरात धाव घेतात. भिवपुरी रोडचा- आषाण्याचा धबधबा गर्दीनं फुलून जातो. वदपचा मात्र त्याला अपवाद आहे. वदपला आषाण्यासारखी हॉटेल्स, इतर सोयी नाहीत म्हणून असेल कदाचित पण इथला निसर्ग अजूनही जवळपास untouched आहे.

कर्जतकरांसाठी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या भटक्यांसाठी वदप नवं नाही. ट्रेकर्सचं नंदनवन असलेल्या या परिसरातला एक कठीण ट्रेक आहे ढाक-भीमाशंकर. मिनी माथेरान अशी ओळख याच ढाकच्या पायथ्याशी आहे वदप गाव. ज्या डोंगरात ढाकचं पठार आहे, त्याच डोंगरात वदपच्या बाजूला एक पावसाळी धबधबा आहे.

एकाबाजूला भीमगडची टेकडी आणि दुसरीकडे ढाकला जाणारा रस्ता यांचा पाहरेकरीच आहे सुभेदार धबधबा. मी स्वतः याआधी एकदाच कधीतरी लहानपणी इथं गेले होते.

वदपला कर्जत-जांभिवली रस्त्यावरून एक पायवाट या धबधब्याकडे जाते. पायवाट असली तरी वर ढाकला राहणाऱ्या लोकांसाठी ती वाटच राजमार्ग आहे. त्याच वाटेवरून चालत आम्ही निघालो. आम्ही म्हणजे आम्ही तिघीच- मी, प्रणाली आणि पद्मा. पायवाटेला लागल्यावर आम्ही चपलांनाही सुटी दिली. आणि ओलसर मातीतून चालू लागलो. एरवी धुक्यात, ढगाआड असणारा डोंगर आज सूर्यप्रकाशात चमकत होता मधूनच. पण त्यामुळं सुभेदार आणखीनच सुंदर दिसतात.

पायवाटेवरून चालताना सतत पाण्याची गाज साथ देत राहते. दुरून जवळ वाटणारा डोंगर पण वळणावळणाच्या रस्तामुळं किमान अर्धा किलोमीटर चालावं लागतं आणि मग पाण्याचं पहिलं दर्शन होतं. वदपचा धबधबा अनेक स्टेप्समध्ये आहे. किमान चार ठिकाणी पाणी थेट खाली झेप घेतं. आम्ही वरून दुसऱ्या स्टेपपर्यंत गेलो. अर्थात वाटेत पाण्यात डुबकी मारण्यासाठी थांबत थांबतच.

धबधब्यापर्यंत पोहोचणं तर सोपं आहे, पण वर चढ मात्र बराच आहे. पायवाटासुद्धा भरपूर पाऊस पडला तर पाण्यानं भरून वाहणाऱ्या.. कधी धबधब्यातून तर कधी निसरड्या, जंगलात हरवणाऱ्या पायवाटांवरून आम्ही चढत गेलो. वर जाऊ तसा चढ आणखी खडा होतो. दाट झाड़ीतून रस्ता शोधत, पाण्याच्या आवाजाच्या आधारानं आम्ही वर चढलो. आणि अर्थाच सगळा थकवा विसरून गेलो. पाणी तर फ्रीजरमधून काढल्यासारखं गारेगार. वर डोंगरावर ढगांची मीटिंग चाललीय. समोर दरीत भातशेती वाऱ्यावर डोलतेय.. मधूनच सूर्याजीराव डोकावून जातायत... उजवीकडच्या भीमगडावर बकऱ्या चरायला जातायत.. डावीकडे ढाकवाले सराईतपणे गावाच्या रस्त्यानं चढतायत..

आमच्यासाठी तो स्वर्गच होता. पण वर राहणाऱ्यांसाठी जगणं किती कठीण आहे याचीही ती झलक होती. पुढचा ट्रेक ढाकपर्यंत, असं ठरवूनही टाकलंय. पाहुयात, कधी जमतोय बेत..
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही तिथं गेलो होतो आणि म्हणूनच तो अनुभव वेगळा ठरला. वास्तवाची जाणीव करून देणारा. या परिसरावर निसर्गानं आपला जीव ओवाळून टाकलाय अगदी. पण जगणं अगदी खडतर आहे इथं. डोंगरमाथ्यावर ढाकमध्ये तर आता आतापर्यंत वीज नव्हती. सोलर पॅनल्सनी तो प्रश्न सोडवलाय. एरवी माणसांची जा-ये फारशी नसायचीच. आता इथंही वावर वाढलाय आणि प्लॅस्टिक बॅग्ज दिसू लागल्यायत. पण परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाणार नाही याचीही वेळीच काळजी घ्यायला हवी.

Monday, April 19, 2010

Review: Rising Sun

I love reading Michael Crichton, and wish to read all his books. Crichton was a great story-teller, he blended facts with fiction so seamlessly! He certainly knew how to write, and he knew how to keep our attention.

Like all other works by Crichton, 'Rising Sun' is a captivating novel. a murderMystery at first glance, with a deeper meaning inside.

Two Policemen, Peter Smith and John Connor set on to investigate a murder. In an empty conference room on the forty-sixth floor of Nakatomo Tower, Los Angeles, the dead body of a beautiful young call girl has been found sprawled out on a table. Nothing about this investigation is straightforward. As more details are revealed, Connor and Smith find themselves "in the warzone" of a business battle. The Japanes think Business as a War. And Americans cannot really compete with Japan, a reality in the 80s and 90s.

A very good plot, somewhat partial to America,but excellent comparisons between two cultures. indicates the weaknesses in the economy of The Superpower of the world.

The Novel actually comes as a commentary on Japenese-American relations. on the love and hate relationship between these two countries. Crichton tells America through the book, that there is a different world outside, a different way of looking at the life. and that's the best part of it.

So, if you get a chance, do read it.

Of course, Things have changed a lot in past 18 years, Japanese Economy has stalled, US no more fears of Japan. still there are other countries rising up, and competing at the global level. and there continues to be a Xenophobia- fear and dislike of foreigners, in minds of people. not just in America, but throughout the world.